SOCIAL MEDIA
=========================================
ड्रायव्हिंग विषयी महत्वाचे
पॉईंट्स
सध्याच्या काळात वाहन चालवता येणे ही एक आवश्यक बाब झालेली आहे. आवश्यकते सोबतच वाहनाची स्वतःची तसेच रस्त्याची रस्त्यावरील वाहतुकीची जबाबदारी ही आपण सर्वांची आहे. एखादा व्यक्ती बेजबाबदारपणे वाहन चालवत असेल तर इतर वाहन चालकांना त्यापासून धोका निर्माण होतो. त्यामुळे वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियमांचे पूर्ण पालन करून वाहन चालवावे. वाहनाचा वेग मर्यादित असेल तर वाहनावरील नियंत्रण पूर्णतः सुरक्षित असते.
एखादे वाहन 60 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत असेल तर त्याला दहा किलोमीटर जाण्यासाठी दहा मिनिटे लागतात. म्हणजे मिनिटाला एक किलोमीटर किंवा एक किलोमीटर ला एक मिनिट याप्रमाणे वाहन चालते. जर एखादे वाहन ताशी 80 किलोमीटर प्रतितास वेगाने चालत असेल तर त्याला दहा किलोमीटर जाण्यासाठी 7.5 मिनिटे लागणार. म्हणजे दहा किलोमीटर मध्ये फक्त अडीच मिनिटांचा फरक पडतो. परंतु ताशी 60 किलोमीटर चा स्पीड हा स्वतःच्या तसेच बाईकच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे.
सर्वसाधारणपणे टू व्हीलर कंपनी त्यांच्या वाहना करिता 45 ते 55 किलोमीटर प्रति तास हा स्पीड शिफारस करतात. जेणेकरून वाहनाचे मेंटेनन्स हे चांगले राहील.
आपण चालवत असलेल्या वाहनाचा वेग हा स्व नियंत्रित असावा. रस्ता चांगला आहे म्हणून किंवा वाहन जास्त वेगाने पळू शकते म्हणून वेग मर्यादेचे उल्लंघन करणे घातक होऊ शकते.
तरी सर्व वाहन चालकांनी प्रामुख्याने दुचाकी वाहन चालकांनी वेगमर्यादेला आवर घालून वाहतूक नियमाचे पूर्णतः पालन करावे. जेणेकरून वाहनाची सुरक्षितता व स्वतःची सुरक्षितता तसेच रस्त्यावरील इतरांची सुरक्षितता जोपासता येईल.
एखादे वाहन 60 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत असेल तर त्याला दहा किलोमीटर जाण्यासाठी दहा मिनिटे लागतात. म्हणजे मिनिटाला एक किलोमीटर किंवा एक किलोमीटर ला एक मिनिट याप्रमाणे वाहन चालते. जर एखादे वाहन ताशी 80 किलोमीटर प्रतितास वेगाने चालत असेल तर त्याला दहा किलोमीटर जाण्यासाठी 7.5 मिनिटे लागणार. म्हणजे दहा किलोमीटर मध्ये फक्त अडीच मिनिटांचा फरक पडतो. परंतु ताशी 60 किलोमीटर चा स्पीड हा स्वतःच्या तसेच बाईकच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे.
सर्वसाधारणपणे टू व्हीलर कंपनी त्यांच्या वाहना करिता 45 ते 55 किलोमीटर प्रति तास हा स्पीड शिफारस करतात. जेणेकरून वाहनाचे मेंटेनन्स हे चांगले राहील.
आपण चालवत असलेल्या वाहनाचा वेग हा स्व नियंत्रित असावा. रस्ता चांगला आहे म्हणून किंवा वाहन जास्त वेगाने पळू शकते म्हणून वेग मर्यादेचे उल्लंघन करणे घातक होऊ शकते.

1. पहाटेच्या सुमारास म्हणजे रात्री 1 ते 4 प्रवास किंवा ड्रायव्हिंग कटाक्षाने टाळावे , कारण या वेळी खूप झोप येत असते.
2. सलग दोन तासांवर ड्राइविंग करू नये, चुका होऊन अपघात घडू शकतो.
दर दोन तासांनी ब्रेक घ्यावा , तोंडावर पाणी मारावे , चहा किंवा कॉफी घ्यावी.
3. रात्रीचे ड्राइविंग एकट्याने करू नये , शक्यतो सोबत कुणीतरी असावे.
4. दोन हजार किमी पेक्षा अधिक प्रवास असल्यास वाहन सर्विस सेंटर मधून तपासून घ्यावे.
5. रात्रीच्या वेळी ओसाड, अनोळखी ठिकाणी गाडी थांबवू नये.
6. दिवसा देखील लघु शंकेसाठी गाडी थांबवायची वेळ आल्यास सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवावी.
7 गाडीतील डिझेल, पेट्रोल पूर्ण संपायची वाट बघू नये, कायम दहा लिटर टाकीत शिल्लक ठेवावे.
8. हवा शक्यतो सकाळी चेक करावी, स्टेफनी मधील हवा देखील चेक करावी.
9. गाडी पेट्रोल इंजिनाची असल्यास सकाळीच पेट्रोल भरावे.
10. कितीही घाई असल्यास आक्रमक ड्राइविंग करू नये.
11. पुढील पूर्ण रस्ता रिकामा दिसत असेल तरच ओव्हर टेकिंग करावे.
12. वाहनाचा वेग कितीही चांगला आणि रिकामा रस्ता असला तरीही जास्तीत जास्त 80 किमी प्रति तास ठेवावा, कारण कुणीही अचानक मध्ये येऊ शकते.
13. वाहन ब्रेक दाबून नियंत्रित करण्या पेक्षा गिअर डाऊन शिफ्टिंग करून इंजिन ब्रेकिंग वापरून नियंत्रित करणे शिकावे.
14. इतर वाहनांसोबत शर्यत लावणे टाळावे.
15. दोन ट्रक्स च्या मध्ये गाडी चालवू नये, कारण अवजड वाहन पटकन थांबू शकत नाही किंवा वळू शकत नाही.
16. डावीकडे किंवा उजवीकडे वळण्या आधी इंडिकेटर नक्की वापरावा.
17. स्टेपनी ची देखील हवा कायम चेक करावी.
18. गाडीत चांगल्या प्रतीचा टॉर्च ठेवावा.
19 गावाबाहेरच्या प्रवासाला निघण्या आधी इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, कुलंट वायफर टॅंक मधील वॉटर यांचे लेव्हल तपासावी, गरज असल्यास ऍड करावे.
20. टायर्सची कंडिशन कायम तपासावी , टायर मध्ये अडकलेले खडे काढून टाकावेत, यासाठी लागणारे उपकरण ऑनलाइन मिळते, यामुळे टायर्स चे आयुष्य वाढते.
21. डिझेल इंजिन असलेले वाहन असेल तर स्टार्टर मारल्यावर लगेच रेस करू नये, एक मिनिट इंजिन आईडल स्पीडवर ठेवावे, तसेच प्रवास संपल्यावर इंजिन लगेच बंद करू नये, एक मिनिट आईडल करून मग बंद करावे.
22. सीट बेल्ट नक्की लावावा कारण लावला नसल्यास एअर बॅग ऑपरेट होत नाहित.
23. गाडी वेगात असताना आपली गाडी आणि पुढील गाडी यात सुमारे 50 फूट अंतर राखावे, अचानक ब्रेक दाबायची वेळ आली तर फायदा होतो.
24. पत्ता विचारावा लागल्यास शक्यतो ट्राफिक पोलीस, पेट्रोल पंप, स्थानिक दुकानदार यांना विचारावा.
25. गाडीची कागदपत्रे , म्हणजे RC book, PUC, Insurance व ड्रायव्हिंग लायसन सोबत कायम ठेवावीत.
26. फास्ट टॅग अकाउंट मधील बॅलन्स चेक करावा.
27. गाडीतील पाण्याच्या बाटल्या साईड कप्प्यात व्यवस्थित ठेवाव्यात , खाली पायात ठेऊ नयेत , बाटली ड्रायव्हरच्या क्लच किंवा ब्रेक खाली आल्यास मोठा अपघात होऊ शकतो.
28. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस लिफ्ट देऊ नये.
29. रात्रीच्या प्रवासात समोर अपघात झालेल्या दिसल्यास सावध व्हावे , गाडी थांबवू नये, पोलिसांना किंवा हायवे पेट्रोल यांना कळवावे , हा लुटायचा ट्रॅप असू शकतो.
30. आपत्कालीन स्थितीत गाडीची काच फोडायची वेळ आल्यास सीटच्या हेडरेस्ट चा वापर करता येतो. हेड रेस्ट चे स्टीलचे बार समोरून टोकदार असतात. ज्यांनी काच फोडणे सहज शक्य होते. शक्यतो मागील बाजूचा काच फोडावा.
माणिक केवटे.
कळंब जिल्हा यवतमाळ
9422166944.
=========================================
=========================================
=======≈=================================
=========≈==============================
व्हीजन
डॉ. सौ. माधुरी माणिक केवटे.
कळंब. जिल्हा यवतमाळ. 9422166944
प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट ध्येय घेऊन आपल्या जीवनाच्या उद्दिष्ट प्राप्ती करता सतत प्रयत्न करत असतो. व्यक्ती परत्वे उद्दिष्ट बदलत राहते. जीवनामध्ये सफलता प्राप्त करणे हा एक ध्यास त्यांच्यामध्ये राहतो कोणत्याही व्यक्तीला असं वाटत नाही की आपण आहे त्या परिस्थितीमध्ये रहावे आणि त्यात परिस्थिती सापेक्ष बदल व्हावा ही त्यांची प्रामाणिक इच्छा असते. उद्दिष्ट प्राप्ती करिता ध्येय निश्चिती करणे महत्त्वाचे आहे परंतु यासोबतच आपला दृष्टिकोन हा त्याकरीता फार मदत करतो, त्याला व्हिजन असे म्हटले जाते. व्हिजन जर आपले चांगले असेल तर ध्येय ठरविणे व ध्येयपूर्ती करणे, उद्दिष्ट पूर्ती करणे सहज साध्य होते.
आयुष्यामध्ये ज्या लोकांचा दृष्टिकोन हा स्पष्ट होता त्या व्यक्तींनी निश्चित अशी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक, राजकीय क्रांती केलेली आपण बघतो आहे.
थोर सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःचा दृष्टिकोन स्वतः स्पष्टपणे समजून घेतल्यामुळे ते सामाजिक दृष्ट्या क्रांती करू शकले. स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रचला. वेगवेगळ्या प्रकारच्या रुढीपरंपरावर मात केली. स्वतः एक चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन समाजामध्ये आदर्श निर्माण केला. एक उत्कृष्ट कवी, उत्कृष्ट साहित्यिक, समाज सुधारक, बिल्डर, शिक्षण क्षेत्रातील प्रभुत्व असे विविध पैलू त्यांच्या दृष्टिकोनात होते. दृष्टिकोन स्पष्ट असल्यामुळे आई सावित्री ची सोबत घेऊन त्यांनी समाजाला एक दिशा दिली. असे कितीतरी उदाहरण आपल्याला देता येईल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही स्वतः शिक्षण घेऊन वेगवेगळ्या पदवी प्राप्त करून समाज उथ्थानासाठी यशस्वी प्रयत्न केले आणि भारतीय संविधान लिहून जगापुढे एक आदर्श निर्माण केला.
सिंधुताई सपकाळ यांनी अनाथाची माय म्हणून लौकिक मिळवला. त्या त्यांच्या ध्येयाप्रती प्रामाणिक प्रयत्न करून या पुरस्कारास प्राप्त ठरल्या. ध्येयाचा ध्यास असला की उद्दिष्ट गाठणे सोपे जाते. ध्येय हे दिखाऊ कधीच असू नये ध्येय हे निश्चित असले
पाहिजे. आणि त्याकरता आपला दृष्टिकोन हा व्यापक असला पाहिजे. आपले व्हिजन स्पष्ट असले पाहिजे. म्हणजे मार्ग मोकळा राहतो.
आपल्या महाराष्ट्रातील आणखी एक उदाहरण द्यायचे झाल्यास. लता खरे नामक महिलेने पतीच्या आजारावरील उपचाराकरता मॅरेथॉन जिंकली. कुठलीही सुख सोयी, सुविधा नसताना, कुठलंही मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा पूर्वानुभव नसताना. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मॅरेथॉन जिंकून औषधोपचारासाठी निधी उपलब्ध करून घेतला. त्या महिलेचे पतीचा उपचार करून घेणे हे व्हिजन अगदी स्पष्ट होतं.
बरेच व्यक्ती एक विचार मनामध्ये ठेवून काम करतात. परंतु दृष्टिकोन स्पष्ट नसल्यामुळे प्रगती साध्य करता येत नाही. त्यासाठी आपल्याला आपला दृष्टिकोन चांगला ठेवून आपल्या जीवनात काय करायचे आहे याची निश्चिती करून मार्गक्रमण करावे.
सर्वांना खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद
Comments
Post a Comment